tag:blogger.com,1999:blog-150516653037581243.post8149404267675407895..comments2023-11-20T10:01:45.707+05:30Comments on रेघ: कुमार केतकरांना गहिवरून का आलं?Unknownnoreply@blogger.comBlogger16125tag:blogger.com,1999:blog-150516653037581243.post-58177795176583397192013-12-17T18:45:12.940+05:302013-12-17T18:45:12.940+05:30Actually even today if you watch or listen to Mr....Actually even today if you watch or listen to Mr. Ketakar on various debates on TV, you will find him totally confused. I think to get confused and confuse others is his characteristic. That is why I have found him unfortunately in laughable situations in many debates... Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-150516653037581243.post-58639131620027087572013-12-17T16:57:33.756+05:302013-12-17T16:57:33.756+05:30You seems serious about Journalism and Media. Will...You seems serious about Journalism and Media. Will watch it.and Read it.Nishikanthttps://www.blogger.com/profile/17568643790528345460noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-150516653037581243.post-77781784646520131822013-12-16T20:14:18.713+05:302013-12-16T20:14:18.713+05:30Initially I used to think that bears & bulls a...Initially I used to think that bears & bulls are two parties in Share Market. (Like Kabaddi) but subsequently knew that One person can be bear & Bull at the same time. Both Balasaheb & Kumar fit perfectly in this shoe.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-150516653037581243.post-9612653252293167422013-04-22T12:38:33.728+05:302013-04-22T12:38:33.728+05:30सूचना पहिली- कोणाचीही व्यक्तिगत नाचक्की करणं, अनाद...सूचना पहिली- कोणाचीही व्यक्तिगत नाचक्की करणं, अनादर करणं हा या नोंदीचा उद्देश नाही, फक्त एक विरोधाभास दाखवून देणं एवढाच उद्देश.<br /><br />सूचना दुसरी- 'रेघ'वर इतर ज्यांचे लिखाण प्रसिद्ध झाले आहे त्यांच्यावर या नोंदीची कोणतीही जबाबदारी नाही. म्हणजे ज्याने ही नोंद लिहिल्येय त्याचीच फक्त जबाबदारी.<br /><br />सूचना तिसरी- फुटकळ राजकारणं, किंवा अनावश्यक चिखलफेक असाही उद्देश नाही.<br /><br />सूचना चौथी- खोटी चर्चा, त्यातून मिळणारा आनंद यांचाही या नोंदीशी काही संबंध नाही.<br /><br />सूचना पाचवी- वर दिलेल्या सूचनांचा असा अर्थ नाही की, आपण चेपून बोलतोय. पण माणूस महत्त्वाचा आहे, आणि बाकीच्यांना अनुल्लेखाने मारता येईल म्हणजे त्यांच्याबद्दल काय बोलणार?, पण ह्यांना नाही, कारण हे खरे अभ्यासू आहेतच. किंबहूना म्हणूनच त्यांच्याकडून अशा विरोधाभासांची अपेक्षा नाही.<br /><br />मराठी लोकांशी बोलताना सगळ्या गोष्टी अति स्पष्ट करून सांगाव्या लागतात. नाहीतर कशातून काय अर्थ काढतील सांगता येत नाही.<br />__________________<br /><br />१० सप्टेंबर २००९ रोजी 'पुणे श्रमिक पत्रकार संघा'त झालेल्या कुमार केतकर यांच्या भाषणाची ही <a href="http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=7069:2009-09-10-15-27-59&catid=25:2009-07-09-02-01-06&Itemid=2" rel="nofollow">बातमी</a>.<br /><br />सुरुवातच अशी आहे- "मराठी भाषक वृत्तपत्रांचे भविष्यात ‘मार्केट’ वाढेल"<br /><br />पुढे- "भविष्यात मराठी माध्यमांचा व्यवसाय कमी होऊन तो अन्य भाषांच्या वृत्तपत्रांकडे जाण्याची भीती आहे, परंतु तसे झाले तरी त्यांचे ‘मार्केट’ वाढेल."<br /><br />आणखी पुढे- "महाराष्ट्रात १० कोटी जनता मराठी भाषा बोलते. ती इंग्लंडच्या लोकसंख्येच्या दुप्पट आहे. त्यामुळे मराठी भाषेला तसेच मराठी माध्यमांनाही मरण नाही, असे म्हणावे लागेल’, असेही ते म्हणाले."<br /><br />पूर्ण बातमी दिलेल्या लिंकवर जाऊन वाचता येईल.<br />__________________<br /><br />फ्रंटलाईन पाक्षिकाच्या (८ मे - ) २१ मेच्या अंकात महाराष्ट्र राज्याला पन्नास वर्षं पूर्ण झाल्याबद्दल कुमार केतकर यांची <a href="http://www.frontline.in/navigation/?type=static&page=flonnet&rdurl=fl2710/stories/20100521271011600.htm" rel="nofollow">मुलाखत</a> छापली आहे. या मुलाखतीत मुलाखतकाराच्या दहाव्या प्रश्नाला उत्तर देताना केतकर म्हणतात, ". . . आजपासून वीस वर्षांनी लोकसत्ता नसेल- ते आर्थिकदृष्ट्या परवडणार नाही. खरंतर तेव्हा कोणताच मराठी पेपर नसेल. पुस्तिका किंवा तत्सम काही असेल. लोक मराठी बोलतील पण वर्तमानपत्र परवडणार नाही."<br />(Twenty years from now there will be no Lok Satta – it will not be economically viable. In fact there will be no Marathi paper. There may be pamphlets or something. People will speak Marathi but the newspaper will not be viable.)<br />__________________<br /><br />आता अजून काय बोलणार?<br /><br />पुण्यातल्या भाषणाच्या वेळी जे श्रोते होते ते बहुसंख्य मराठी, त्यात बरेच विद्यार्थी, त्यातले बहुसंख्य ग्रामीण किंवा निमशहरी भागांतून आलेले.<br /> <br />फ्रंटलाईनचे वाचक कोणते आहेत?<br /><br />कोण कोणाला फसवतंय? काय चाललंय? कोणी कोणाला प्रश्न विचारत नाही, मग उत्तरं कोण देणार? मुळात उत्तरं कोणाला हव्येत?Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-150516653037581243.post-13348170068468328672012-12-27T16:20:13.532+05:302012-12-27T16:20:13.532+05:30१. जी गर्दी जमलेली त्यांच्यातल्या किती जणांना '...१. जी गर्दी जमलेली त्यांच्यातल्या किती जणांना 'एस.एम.' माहीत असतील? 'मी एस. एम.' असलं काहीतरी पुस्तक आहे हे कितींना माहीत असेल? पण 'सामना' मात्र रोजच्यारोज कित्येक पटींनी खपतो. प्रसिद्धी ही अशी आहे. अशा पार्श्वभूमीवर ठाकऱ्यांवर 'एस.एम.'चा प्रभाव होता असलं बोलून काय होणार आहे? आणि समजा तसं काही सिद्ध झालं तरी ही वेळ अशी होती की तेव्हा बहुतेकांना ठाकऱ्यांवर प्रभाव होता म्हणजे 'एस.एम.' हेच कोणीतरी हिंदुत्त्ववादी नेते आहेत असं वाटायला लागलं असतं. त्यामुळे वेळ असेल तेव्हा एस.एम.चं महत्त्व सांगणं किंवा ठाकऱ्यांचे दोष (किंवा महत्त्व) सांगणं एवढंच पत्रकार आणि संपादक म्हणून केतकरांचं काम होतं असं वाटतं. त्यापलीकडे त्यावेळी राजकीय चतुराई दाखवून काय मिळालं? एस.एम.चा, डांग्यांचा प्रभाव ठाकऱ्यांवर आहे असं अगदी सिद्ध जरी झालं, तरी ठाकऱ्यांच्या विचारसरणीला मानणारे ठाकऱ्यांचंच म्हणणं ऐकणार, मग असल्या मांडणीने साध्य काय होतं? तसं म्हटलं तर ठाकऱ्यांवर शिवाजी महाराजांचा प्रभाव होता असंही म्हणतात, त्याने या सगळ्या गदारोळाला शिवाजीसारख्या खऱ्याखुऱ्या थोर राजाच्या नावामुळे काही विधायक वळण मिळालं का कधी? मुळात ठाकऱ्यांचा प्रभाव हेच त्यांच्या अनुयायांचं मुख्य वैचारिक खाद्य असताना ठाकऱ्यांवर कोणाचा प्रभाव होता हे सिद्ध झाल्याने काय फरक पडणार आहे? त्यापेक्षा ठाकऱ्यांचं काय पटत नाही ते इंग्रजीत सांगितलं तसं ते इकडे सांगायला जमत असेल तर सांगावं ना.<br />उलट केतकर ज्या पद्धतीने बोलले त्यामुळे अशा गर्दीला आपण ठीकच आहोत आणि ठाकरे हेच मराठीपणाचा आधार होते यावर आणखी विश्वास बसेल. बाकी काय होणार? पत्रकार-संपादक म्हणून केतकरांचं काम राजकीय चतुराई दाखवणं होतं की (राजकीय विश्लेषणाची तुम्ही म्हणताय तशी दृष्टी ठेवून का होईना) जे त्यांचं खरं मत आहे ते देणं हे त्यांचं काम आहे? <br />२. आणि केतकर फक्त ठाकऱ्यांच्याच बाबतीतच नव्हे तर इतर बाबतीतही असं करतात त्याचं एक उदाहरण घेऊन पूर्वी रेघेवर नोंद केली होती, ती वर दिली आहे. पुण्यातल्या भाषणात तरुण पत्रकारांसमोर सांगायचं, मराठी मीडियाचं मार्केट भविष्यात वाढेल आणि इंग्रजी पाक्षिकाला दिलेल्या मुलाखतीत सांगायचं की, twenty years from now there will be no Loksatta. हे सगळं मुळातूनच वाचता येईल.<br />३. ते हे सगळं वैयक्तिक स्वार्थासाठी करतात किंवा नाही, हे मला माहीत नाही. मी एक प्राथमिक पातळीवरचा वाचक आहे असं गृहीत धरलं तर जे विरोधाभास दिसतील, ज्या गोष्टी चुकीच्या वाटतील ते नोंदवण्याचा फक्त हा प्रयत्न आहे. 'सर्वसामान्य' असं ज्यांना म्हटलं जातं त्यांची ही फसवणूक आहे असं वाटतं. ती ते अजाणता करत असतील तरी ती होते असं वाटतं. अवधूत डोंगरेhttps://www.blogger.com/profile/07584335462907094516noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-150516653037581243.post-2218938278633898872012-12-27T14:51:46.005+05:302012-12-27T14:51:46.005+05:30http://regh1.blogspot.in/2010/05/blog-post_25.html...http://regh1.blogspot.in/2010/05/blog-post_25.htmlAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-150516653037581243.post-51838511889193699522012-12-27T14:43:34.906+05:302012-12-27T14:43:34.906+05:30 कुमार केतकरांनी मराठी माध्यमांसमोर एक भूमिका मा... कुमार केतकरांनी मराठी माध्यमांसमोर एक भूमिका मांडली आणि इंग्रजी माध्यमांमध्ये त्याच भूमिकेची दुसरी बाजू मांडली. केतकरांचा सामान्यपणे असा प्रयत्न असतो की जे लोकप्रिय आहे त्याला पूर्णपणे नाकारण्यात अर्थ नाही. या लोकप्रियतेला विधायक रस्त्याकडे वळवण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांना हिंदुत्ववादी पठडीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न त्यांनी केला. एस.एम.जोशी, भाई डांगे, आचार्य अत्रे, जॉर्ज फर्नांडिस अशा डाव्या नेत्यांचा प्रभाव ठाकरे यांच्यावर होता, असंही त्यांनी आवर्जून सांगितलं. मला केतकरांच्या भूमिकेमध्ये विरोधाभास दिसत नाही, चतुराई दिसते. त्याला धूर्तपणा म्हणणं चुकीचं ठरेल कारण अशी भूमिका मांडून केतकरांनी आपला स्वार्थ साधलेला नाही. <br /> परंतु या चतुराईला फारसा अर्थ नसतो. बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीमत्वाचं शिवसैनिकांचं आकलन हेच निर्णायक ठरतं. शिवसेना हीच बाळासाहेबांची शक्ती होती. त्यामुळेच अशी मांडणी केल्यावरही, इंग्रजी भाषेत लिहीलेल्या लेखामुळे, केतकरांना पोलीस संरक्षणात फिरावं लागलं. <br /> राजकारणावर लिहीत असताना, वाचकवर्ग ध्यानी घेऊन कोणत्या मुद्द्यावर जोर द्यायचा वा कोणता मुद्दा गाळायचा हे ठरवावं लागतंच. मला त्यामध्ये विरोधाभास दिसत नाही. <br /> संयुक्त महाराष्ट्र समिती बरखास्त झाली त्यामुळे शिवसेना जन्म अटळ ठरला या केतकरांच्या विश्लेषणातलं तथ्य नाकारण्यात अर्थ नाही. कम्युनिस्ट आणि समाजवादी यांच्यातील मतभेद आंतरराष्ट्रीय प्रश्नासंबंधात होते. उदा. इम्रे नाझ या हंगेरीतील कम्युनिस्ट नेत्याला फासावर लटकवण्यात आलं हा मुद्दा मुंबई महापालिकेत आणण्याची गरज नव्हती. या विषयावर प्रजा सोशलिस्ट, संयुक्त सोशलिस्ट आणि कम्युनिस्ट यांच्यामध्ये टोकाचे मतभेद होते. संयुक्त महाराष्ट्राशी या प्रश्नाचा काय संबंध होता? त्या काळातला कामगार वर्ग आणि मराठी अस्मितेचा पेचही केतकरांनी अतिशय मोजक्या शब्दांमध्ये अचूकपणे मांडला. <br /> केतकरांच्या चतुराईला मी दाद देतो पण तुम्ही राजकीय नेते असाल तरच अशी चतुराई उपयोगी पडते वा विधायक वळण देऊ शकते. कारण चतुराईच्या म्हणजेच आपल्या भूमिकेच्या मागे राजकीय शक्ती उभी करणं गरजेचं असतं. पत्रकाराला ते शक्य नसतं. आणि महाराष्ट्रातील हल्लीच्या राजकीय नेत्यांमध्ये केतकरांचं म्हणणं कळण्याइतकी प्रगल्भता नाही आणि असली तर तीही चुकीच्या पक्षात असलेल्या नेत्यांकडे असेल. Sunilhttps://www.blogger.com/profile/00443725733251481715noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-150516653037581243.post-41274991125926459742012-12-18T22:11:49.469+05:302012-12-18T22:11:49.469+05:30या गोष्टीचे स्वागत यासाठी की, व्यासपीठाचा रंग पाहू...या गोष्टीचे स्वागत यासाठी की, व्यासपीठाचा रंग पाहून विचाराचा रंग बदलणारे लोक कोणत्या तोंडाने कोणाला काही विचारू शकतील? नैतिकता, विचार या गोष्टींचा उठता बसता जप काणारे लोक काय आणि कसे आहेत, हे जाहीरपणे तुम्ही सांगितलेत. फारच छान केलेय हे. मराठी पत्रकारितेतील 'केतकर संप्रदायाला' कदाचित हे मानवणार नाही. यांचे मातीचे पाय तुम्ही दाखवून दिलेत. लिखाणात कुठेही प्रचारकीपणा-बाणा नाही, हा आणखीन एक महत्त्वाचा विशेष.bhauchaskarhttps://www.blogger.com/profile/14913042615575850959noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-150516653037581243.post-1992843316458314862012-12-18T15:15:21.526+05:302012-12-18T15:15:21.526+05:30Superb,as always! well done....काळ तर मोठा कठीण आ...Superb,as always! well done....काळ तर मोठा कठीण आला भाऊ.... हा पण एक प्रकारचा भ्रष्टाचारच आहे..आणि तो आर्थिक भ्रष्टाचारापेक्षा भयंकर आहे....केतकरांनी असं करण्यामागचं कारण काय असावं? ही केतकरांची शिवसेनेप्रति चमचेगिरी आहे का? कशासाठी...तशी बऱ्यापैकी प्रसिद्धी,पैसा ,नाव तर त्यांना मिळालेलं आहेच..मी IBN वरचा कार्यक्रम पाहिलेला नव्हता.धन्यवाद. Snehal Bansode.https://www.blogger.com/profile/05137331507100432172noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-150516653037581243.post-79785679327480702482012-12-18T06:17:49.312+05:302012-12-18T06:17:49.312+05:30आजकाल सगळ्या ठिकाणी व्यावसायिकपणा आला आहे.
आपण ज्य...आजकाल सगळ्या ठिकाणी व्यावसायिकपणा आला आहे.<br />आपण ज्या माधामांच्या पुढे बोलत आहोत किंवा लिहित आहोत , त्याचा श्रोता व वाचकास नक्की आपल्याकडून काय ऐकायला आवडेल ह्याचा अंदाज मुरब्बी पत्रकार लावून त्याप्रमाणे लिखाण किंवा वक्तव्य करतात.<br />गंदा हे पर धंदा हे ये <br />सर्व हिंदू विचारवंत नसतात पण बहुतेक विचारवंत हे हिंदू द्वेष्टे असतात,<br />Panchtarankithttps://www.blogger.com/profile/14281795934242772430noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-150516653037581243.post-5804056323734071702012-12-17T15:40:43.522+05:302012-12-17T15:40:43.522+05:30छान आहे नोंद. पत्रकारितेतील सध्याच्या अनेक बाबी गो...छान आहे नोंद. पत्रकारितेतील सध्याच्या अनेक बाबी गोंधळात टाकणाऱ्या आणि पत्रकारितेच्या विश्वासार्हतेबद्दल शंका निर्माण करणाऱ्या आहेत यात शंका नाही. Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-150516653037581243.post-35534862384392929852012-12-16T23:57:05.857+05:302012-12-16T23:57:05.857+05:30वाचक-प्रेक्षक बघून काय बोलायचं ते ठरवून स्वतःची लो...वाचक-प्रेक्षक बघून काय बोलायचं ते ठरवून स्वतःची लोकप्रियता टिकवण्यासाठी किंवा स्वतःची 'इंटलेक्चूअल' अशी प्रतिमा टिकवून ठेवण्यासाठी केतकर आणि अजून बरेच जण असं करत असणार, असा माझा समज आहे. केतकरांच्या दुटप्पीपणा जाहीर नोंद केल्याबद्दल दाद. हे तसं तू आधीही केलंयस, हे विशेष .....अश्विनी <br />Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-150516653037581243.post-19236386148280606092012-12-16T23:44:09.783+05:302012-12-16T23:44:09.783+05:30हा सगळा प्रकार समजून घ्यायला मोठा कठीण आहे. फोर्ब्...हा सगळा प्रकार समजून घ्यायला मोठा कठीण आहे. फोर्ब्समधल्या लेखाबद्दल कुमार केतकर यांना म्हणे पोलिस संरक्षण देण्यात आले होते. कारण त्यात जातीय उल्लेख आहेत. एकीकडे कोणी आपल्या जातीचे कौतुक उच्च रवाने गाऊ लागले की, ही मंडळी (म्हणजे कोणती, ते सर्वांच्याच ध्यानात येईल.) मानववंशशास्त्राचा हवाला देतात आणि सांगतात गेल्या दीड-दोन सहस्रकांमध्ये एवढा वर्णसंकर झाला आहे की, कोणताच वंश, वर्ण, जात शुद्ध (PURE) राहिलेला नाही. मग इथे एका विशिष्ट जातीत फार उंचीचे कोणी तयारच झाले नाही, असे कसे म्हणता येईल?<br />केतकर मराठीत एक बोलतात आणि इंग्रजीत `कॉमी`साठी वेगळेच लिहितात, हा अनुभव नवा नाही. बाळ ठाकरे यांच्या निधनानंतर सगळ्यांनाच फार गहिवरून आलं होतं. ते भीतीपोटी होतं की प्रेम-आदरापोटी हा संशोधनाचा विषय आहे. विलासराव देशमुखांच्या निधनानंतर एका टीव्ही.च्या संपादकानं ते शिवसेनेत का गेले नाहीत, याचा किस्सा सांगितला होता. त्यात मातोश्रीवर जाऊन मुजरा वगैरे करावा लागतो, हे विलासरावांना पटलं नव्हतं, हे त्यांनी अगदी आवर्जून सांगितलं होतं. विलासराव आणि ठाकरे ही अलीकडच्या काळातली दोन मोठी निधनं. ती टीव्ही वाहिन्यांनी कशा पद्धतीनं साजरी केली, त्यात कोण कोण काय काय बोललं हे अगदी पाहण्यासारखं-वाचण्यासारखं-ऐकण्यासारखं आहे. सगळ्यांनाच धंदा करायचा आहे. मग तो छापील, ऐकीव वा वाचीव कोणतंही माध्यम असो. केतकर दी ग्रेट आहेत, असं म्हणणारे होते. अलीकडच्या काळात त्यांचा आवाज थोडा बसलेला आहे. <br />खरं सांगायचं तर हे सगळं गँगवॉर आहे. तुम्ही कोणाच्या गँगमध्ये आहात, यावर तुम्ही दखलपात्र आहात की नाही, हे ठरतं. पण केतकर यांचा हा दुटप्पीपणा दाखवून दिल्याबद्दल अभिनंदन. अर्थात तो नवा नाहीच मुळी.Unknownhttps://www.blogger.com/profile/09927474258783090156noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-150516653037581243.post-88436418588090676662012-12-16T15:44:37.273+05:302012-12-16T15:44:37.273+05:30BrilliantBrilliantAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-150516653037581243.post-73395592199399420912012-12-16T15:31:19.421+05:302012-12-16T15:31:19.421+05:30Thanks Aniruddha. On Vidyadhar Date's article ...Thanks Aniruddha. On Vidyadhar Date's article that appeared on Regh few days back, you had commented, ''The real question, I have often asked, is why is otherwise kind and intelligent 'Marathi mind' so much attracted to fascism''. I think hypocritical intelligentsia can be a reason for that. There must be many more of course. <br />Most of the journalists either keep mum when it comes to self-criticism or they get aggressive & there is a third category who live in a different world altogether, where nothing needs to be criticised, not at least themselves.अवधूत डोंगरेhttps://www.blogger.com/profile/07584335462907094516noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-150516653037581243.post-86629495629033703442012-12-16T15:16:07.617+05:302012-12-16T15:16:07.617+05:30Brilliant...had not read such an analytical articl...Brilliant...had not read such an analytical article in Marathi outside Samaj-prabodhan-patrika (SMP) for a very long time.<br /><br />But I read it only because it appears on "Ek Regh". Otherwise, I do not take the subject of this post seriously and hence almost never read him or about him or listen to him.Aniruddha G. Kulkarnihttps://www.blogger.com/profile/09246236261997672943noreply@blogger.com