Wednesday 7 November 2012

सिसिफसचं मिथक

- आल्बेर कामू

आल्बेर कामू (फोटो : हेन्री कार्तिअर ब्रेसाँ)
आल्बेर कामूचं जन्मशताब्दी वर्ष आजपासून सुरू होतंय. त्यानिमित्तानं त्याच्या 'द मिथ ऑफ सिसिफस' या गाजलेल्या पुस्तकातल्या अगदीच छोट्या भागाचं हे भाषांतर. 


भला मोठा खडक सतत पर्वतावर ढकलत नेण्याची शिक्षा सिसिफसला देवानं दिली आणि खडक स्वतःच्या वजनानं परत खाली पडणार हेही निश्चित. निष्फळ आणि निराशाजनक कष्टांपेक्षा दुसरी कुठलीही कठोर शिक्षा असू शकणार नाही असं देवाला वाटलेलं.

होमरवर विश्वास ठेवायचा झाला, तर सिसिफस हा मर्त्य प्राण्यांपैकी सर्वांत हुशार आणि विवेकी होता. पण दुसऱ्या एका परंपरेनुसार, त्याला लुटारूचं काम करण्यासाठी पाठवण्यात आलं होतं. यामध्ये मला कोणताही विरोधाभास दिसत नाही. अधोविश्वातला तो एक निष्फळ कामकरी का बनला याच्या कारणांसंबंधी मतभेद असू शकतील. सुरुवात करायची तर, देवांसंबंधी काहीतरी थिल्लरपणा केल्याचा त्याच्यावर आरोप होता. त्यांची गुपितं त्यानं चोरली. इसोपसची मुलगी एगिना ज्युपिटरनं पळवली. ती गायब झाल्यानं वडिलांना धक्का बसला आणि त्यांनी सिसिफसकडे तक्रार केली. या अपहरणाबद्दल सिसिफसला माहिती होती; पण, ती देण्यापूर्वी एसोपसने कोरिन्थच्या गढीला पाणी पुरवावं अशी अट त्यानं घातली. आकाशी गाजेपुढं त्यानं पाण्याचा वर मागितला. यामुळे त्याला शिक्षा झाली. होमर आपल्याला असंही सांगतो की, सिसिफसनं मृत्यूला साखळ्यांनी बांधून ठेवलं होतं. प्लुटोला त्याच्या उद्ध्वस्त, सुन्न साम्राज्याकडे पाहावलं नाही. त्यानं युद्धाच्या देवाला पाठवलं आणि मृत्यूला सोडवून आणलं.

असं म्हटलं जातं की, मृत्यूच्या जवळ असल्यामुळे, सिसिफसला त्याच्या बायकोचं प्रेम तपासून पाह्यचं होतं. आपलं दफन न केलेलं शरीर सार्वजनिक चौकाच्या मध्यभागी फेकण्याची सूचना त्यानं तिला केली होती. सिसिफस अधोविश्वात जागा झाला. आणि मानवी प्रेमाच्या एवढा विरोधी जाणारा आज्ञाधारकपणा पाहून, त्यानं प्लुटोकडून पृथ्वीवर परतून आपल्या बायकोला दंड करण्यासाठीची परवानगी मागितली. पण त्यानं पुन्हा जगाचं तोंड पाहिलं, पाणी, सूर्य, दगड आणि समुद्र अशांचा आनंद घेतला तेव्हा त्याला परत नरकाच्या अंधारात जावंसं वाटेना. सूचना करून झाल्या, कठोर भाषेत सांगून झालं, तरी उपयोग नाही. अनेक वर्षं तो आखातात समुद्राजवळ राहिला. यानंतर मात्र देवांचा आदेश आवश्यक बनला. मग मर्क्युरी आला आणि या बेशरम माणसाची बखोटी धरून सगळ्या आनंदांपासून त्याला दूर नेलं नि जबरदस्तीनं पुन्हा अधोविश्वात नेऊन टाकलं. इथं त्याच्यासाठीचा खडक वाटच पाहात होता.

सिसिफस हा आपला असंगत (अब्सर्ड) नायक असल्याचं एव्हाना तुमच्या लक्षात आलंच असेल. त्याचे आनंद आणि त्याच्यावरचा अत्याचार यातून तो पुरेपूर उरला होता. देवांवरचा त्याचा राग, मृत्यूविषयीचा द्वेष आणि जगण्यावरचं त्याचं प्रेम त्याला ही बोलता न येण्याजोगी शिक्षा मिळाली- यात काहीही पूर्ण न करण्याकडेच त्याच्या अस्तित्त्वाला ढकलून देण्यात आलं. या पृथ्वीवरच्या अभिलाषेपोटी ही किंमत मोजणं भाग होतं. अधोविश्वातील सिसिफसविषयी आपल्याला काही कळण्याचा मार्ग नाही. कल्पनेत जीव ओतण्यासाठी मिथकं तयार केली जातात. या मिथकामधे फक्त प्रचंड खडक वर ढकलण्यासाठीचे प्रयत्न आहेत, शेकडो वेळा केलेले; वेडावाकडा झालेला चेहरा आणि खडकाला चिकटून असलेला गाल, खांद्यानं दिलेला जोर, पायांचा आधार, ताणलेले हात याकडेच आपलं लक्ष जातं. कोणतीही खोली नसलेल्या अवकाशात आणि वेळेत शेवटाकडे त्याचं काम फत्ते झालेलं आहे. पण काही क्षणातच सिसिफसच्या समोरच तो खडक पुन्हा खाली गडगडत जातो. तिथून त्याला परत शिखरापर्यंत खडक ढकलत आणायचाय. तो परत पायथ्याकडे जातो.

त्या परतीच्या वेळी, तेव्हा तो थांबलेला असतो, तिथला सिसिफस मला आकर्षित करतो. दगडाच्या एवढा नजिक राहून तो चेहराच दगड बनल्यासारखा असतो. आपल्याला माहित नसलेल्या या कष्टाकडे जड पण ठाम पावलांनी निघालेला तो माणूस मी पाहातो. त्याच्या कष्टाप्रमाणेच परत परत येणारा तो श्वास घेण्यापुरता काळ हा जाणिवेचा काळ आहे. उंची सोडून तो पुन्हा खाली चालायला लागतो त्या प्रत्येक क्षणी तो त्याच्या प्रारब्धाच्या वरचढ ठरतो. तो त्याच्या खडकापेक्षाही सक्षम आहे.

हे मिथक दुःखदायक आहे कारण त्यातला नायक जागरूक आहे. जर प्रत्येक पावलाबरोबर तो पुढच्या प्रयत्नाकडे जातोय तर त्याचं दुःख कुठाय? सध्या कामकरी तेच काम आयुष्यात दर दिवशी करतात, त्यांचं प्रारब्धही असंगतच आहे. पण ज्या दुर्मिळ क्षणी जागरूकता येते तेव्हा ते दुःखद बनतं. देवांचा कामकरी असलेला सिसिफस सत्ता नसलेला आणि बंडखोर आहे; त्याच्या निष्ठूर परिस्थितीचा आवाका त्याला माहिती आहे. परत खाली येताना तो त्याचाच विचार करतो. त्याच्या यातनांमधे येत जाणारी स्पष्टता हाच त्याचा विजय आहे. तुच्छतेने कमी लेखता येणार नाही असं प्रारब्ध असत नाही.

दुःखानं जर खाली येता येत असेल तर आनंदानंही ते करता येईल. ही अतिशयोक्ती नाही. सुरुवातीला दुःख आहे. पण जेव्हा आठवणीत पृथ्वीची चित्रं यायला लागतात, आनंदाची हाक अनावर होते, तेव्हा माणसाच्या हृदयात खिन्नता येते : हा खडकाचा विजय असतो. किंबहुना हाच खडक असतो. अमर्याद दुःख झेपायला अतिशय जड असतं.

आनंदाच्या नोंदी करण्याचा मोह झाल्याशिवाय कोणाला असंगतीचा शोध लागत नाही. 'काय! असल्या खुज्या मार्गांनी?' पण जग एक आहे. आनंद आणि असंगती हे एकाच पृथ्वीचे दोन पुत्र आहेत. ते अविभाज्य आहेत. आनंद हा असंगतीच्या शोधातूनच येतो असं म्हणणं चूकच ठरेल. अर्थात आनंदातूनच असंगतीची भावना येते. 'सगळं आलबेल आहे असं सांगून थांबतो', असं इडिपस म्हणतो आणि हे विधान पवित्र आहे. माणसाच्या मर्यादित विश्वात ते घुमत राहातं. सगळं संपलेलं नव्हतं आणि संपलेलं नाही याची जाणीव त्यातून होते. असमाधानातून आलेला आणि निष्फळ दुःखाला प्राधान्य देणाऱ्या देवाला हे विधान हुसकावून लावतं. प्रारब्धाला ते मानवी कृती बनवून टाकतं.

सिसिफसचे सगळे अबोल आनंद यात आले. त्याचं प्रारब्ध त्याच्याकडेच आहे. त्याच्या यातनांची पूर्वकल्पना तो समजावून घेतो तेव्हा सर्व मूर्ती गप्प होतात. विश्वातील शांतता पूर्ववत झाल्यामुळे पृथ्वीतील लहान लहान आवाज पुन्हा उठतात. सावलीशिवाय सूर्य नसतो आणि रात्रीचीही ओळख ठेवणं गरजेचं असतं. असंगत मनुष्य होकार देतो आणि न थांबणारे प्रयत्न करत राहातो. त्याच्या दिवसांचा तोच राजा आहे हे त्याला उमजलंय. आपल्या आयुष्याकडे परतून पाहण्याच्या त्या सूक्ष्म क्षणी, सिसिफस दगडाकडे परतत असतो तशाच प्रकारे, त्याला त्याचे प्रारब्ध निर्माण करणाऱ्या असंबद्ध कृती दिसतात; त्यानेच तयार केलेल्या या कृती त्याच्या आठवणीत जमा होता आणि त्याच्या मृत्यूनं त्या थांबतात. सगळ्या मानवी गोष्टींचा मानवी उगम समजल्यामुळे, रात्राचा शेवट नसल्याचं समजलेल्या अंध व्यक्तीप्रमाणे, तो चालतच राहातो. खडक अजूनही ढकलला जातोयच.

सिसिफसला मी पर्वताच्या पायथ्याशी सोडून देतो! प्रत्येकाला आपलं ओझं सापडतं. पण देवांना नकार देणारी आणि खडकांना ढकलणारी अत्युच्च बंडखोरी सिसिफस दाखवतो. सगळं काही आलबेल आहे असाच त्याचा निष्कर्ष आहे. कोणत्याही सत्ताधाऱ्याशिवाय असलेलं हे विश्व त्याला वांझही वाटत नाही आणि निष्फळही वाटत नाही. त्या दगडाचा प्रत्येक अणू, काळोखानं भरलेल्या त्या पर्वतावरच्या प्रत्येक धातूचा कण या सगळ्यानंच जग बनतं. उंचीपर्यंत जायची ही लढाईच माणसाचं मन भरून ठेवण्यास पुरेशी आहे. सिसिफस आनंदीच आहे अशी कल्पना करायलाच हवी.

2 comments:

  1. Robert Zaretsky:

    In early 1941, when Vichy was preparing a second round of anti-Semitic legislation and the papers in France and Algeria were giving free rein to anti-Semitic rhetoric, Camus completed his philosophical essay “The Myth of Sisyphus.” The opening lines are among the best known written by Camus: “There is just one truly important philosophical question: suicide. To decide whether life is worth living is to answer the fundamental question of philosophy. Everything else … is child’s play; we must first of all answer the question.” Of course that question needed to be answered in 1941. How could it be otherwise, given the dire predicament in which the French and French Jews, along with Camus, found themselves?
    But if the question persists, it is because it is more than a matter of historical or autobiographical interest. It is perennial. It is the same question that Job confronts when, with his children dead, his possessions gone, his belief in God tested, and he himself crumpled in a mound of dust and ashes, his wife tells him, “Curse God and die.” And it is the same question we all confront when, as Camus wrote in the “Myth,” the stage sets collapse around us—any number of belief and value systems we have lived with our entire lives—and we suddenly confront a stripped and bare world whose strangeness and opacity beggar any effort at comprehension.
    Job and Sisyphus, in short, are heaved into a world shorn of transcendence and meaning. In response to their demand for answers, they get only silence. Herein lies the absurdity, Camus writes: It is “the confrontation of this irrational and the wild longing for clarity whose call echoes in the human heart. The absurd depends as much on man as on the world. For the moment it is all that links them together.”
    The silence of the world, in effect, only becomes silence when human beings enter the equation. All too absurdly, Job demands meaning. “Behold, I cry out of wrong, but I am not heard/ I cry aloud, but there is no judgment.” And no less absurdly, Job must ask himself what he must do if meaning is not to be found? What is our next step if meaning fails to show up at our appointed rendezvous? “But where shall wisdom be found?/ And where is the place of understanding?”
    We think we know how the story of Job ends: Rewarded by God for his loyalty, Job is paid back with even more children and sheep and property. But is this the ending? A number of biblical scholars suggest the Job we hear in the final chapter, the one who accepts and resigns himself to God’s power play, is not the same Job we hear in the preceding 40 chapters. Instead, he is a throwback to an earlier story that was grafted onto the otherwise perplexing account. Instead, the real Job is Camus’ Job. He is a Job who answers God’s deafening and dismal effort at self-justification with scornful silence.

    ReplyDelete
  2. 'अॅब्सर्ड' ह्या शब्दाला 'विसंगत' हा मराठी पर्याय फारच सरधोपट आहे, आणि त्यावर अनेक पर्याय अनेकांनी सुचवलेत, पण तरी काय करावं हे न कळल्यामुळे या नोंदीत तोच पर्याय वापरलाय. तो चांगल्यापैकी अपुरा आहे... बराच अपुरा आहे...



    ReplyDelete